प्रवास

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्षपदावर नेमणूक झाली.

युवमोर्चा कार्यकर्ता असल्यापासून आजपर्यंत गुढीपाडवा शोभायात्रा सहभाग. चित्ररथांना प्रोत्साहन

स्वा. सावरकर रोड वॉर्डमधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा उमेदवार काँग्रेसचा उमेदवाराचा पराभव करत नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली.

  • सार्वजनिक दहीहंडीच्या माध्यमातून देशभक्ती व समाज प्रबोधनाचे विषय मांडण्यास सुरुवात
  • केडीएमसी क्षेत्रात रिंग रोड डोंबिवली- कल्याण - टिटवाळा योजना

कल्याण डोंबिवली स्थायी समिती सभापतीपदी निवड. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात गरीबांना घरे देणारी बीएसयुपी योजना केंद्र सरकारकडून मंजूर आणण्यात यश.

  • जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून केडीएमसी क्षेत्रासाठी 2600 कोटी मंजूर करून
    बंदिस्त नाले, पाण्याच्या टाक्या, नेतीवली पाणी प्रकल्प, इत्यादी प्रकल्प राबवले
  • गरजू शालेय व महाविद्यालयीन मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रमिक पुस्तके मोफत देणारी पुस्तक पेढी योजना सुरु केली.
  • डोंबिवली विधानसभा मतदार संघाची नव्याने रचना.
  • डोंबिवली विधानसभेचा पहिला आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकली.
  • मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीविरुद्ध आवाज उठवला आणि परीक्षा पुन्हा घेण्यास भाग पाडले
  • डोंबिवलीकर मासिक सुरु केले, संपादकपदी नियुक्ती.
  • मोठागाव माणकोली खाडीपुलासाठी एमएमआरडीएला भेट व पत्र
  • भाजपा प्रणित भारत बंद मध्ये डोंबिवली बंद करण्यात 100% पुढाकार
    विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकरांना डोंबिवलीकर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
  • रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची मागणी
  • गोविंदवाडी बायपास विरुद्ध उपोषण आणि अटक. रस्त्यासाठी संघर्ष म्हणून जामीन घेण्यास नकार देऊन तुरुंगवास पत्करला.
  • ब्राह्मण समाजाची बदनामी करणाऱ्या खेडेकरचा पुतळा जाळून निषेध.
  • डोंबिवलीतील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेबाबत सरकारविरुद्ध विधानसभेत स्थगन प्रस्ताव
  • 100% वीज वसुली असणाऱ्या डोंबिवलीत होणाऱ्या जुलमी लोड शेडींग विरोधात महाराष्ट्र वीज आयोगात दावा दाखल केला. संघर्ष करून शहरातील लोड शेडींग हटवले.
  • डोंबिवलीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करून आणला.
  • डोंबिवलीकर नागरिकांसाठी शासकीय कागदपत्रांसाठी सेतू कार्यालय सुरु केले.
  • डोंबिवलीत प्रथमच रस्ता हक्क परिषद घेतली.
  • लोकल आणि प्लॅटफॉर्म यातील जीवघेण्या गॅपविरुद्ध संघर्ष केला.
  • रेल्वेच्या इतिहासात प्रथमच डीआरएम ऑफिसला टाळे ठोकले
  • क्रिकेट विश्वचषक फायनल साठी महाकाय बॅट बाजी प्रभू चौकात उभारली.
  • डोंबिवलीत 100 ठिकाणी सार्वजनिक सीसीटीव्ही उभारले.
  • रेल्वे स्थानकावर यांत्रिक जिने उभारणीसाठी पाठपुरावा
  • मुंबई ठाणे परिसरातील एकमेव आणि सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजनाला सुरुवात. राज्यातील हजारो गुलाब एकाच ठिकाणी पाहायला डोंबिवलीकरांची तुफान गर्दी.
  • मुलांसाठी किलबिल महोत्सवाचे आयोजन
  • गॅस अदालत आयोजित करून सिलेंडरच्या टंचाईवर मार्ग काढला.
  • मुंबई ठाणे परिसरातील एकमेव आणि सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजनाला सुरुवात. राज्यातील हजारो गुलाब एकाच ठिकाणी पाहायला डोंबिवलीकरांची तुफान गर्दी.
  • मुलांसाठी किलबिल महोत्सवाचे आयोजन
  • दहशतवादी अफझल गुरुला फाशी दिल्याबद्दल साखर वाटून साजरा केला.
  • डोंबिवली पूर्वेला स्वतंत्र शिधा कार्यालय पाठपुरावा यशस्वी
  • एकाच दिवशी 4000 बाटल्या रक्त संकलनाचा रेकॉर्ड
  • डोंबिवली रेल परिषदचे आयोजन
  • आयकॉन्स ऑफ ठाणे पुरस्कार प्राप्त.
  • कला क्रीडा महोत्सव आयोजन
  • गॅस पाईपलाईन चा पाठपुरावा
  • डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी सलग दुसऱ्यांदा विजयी
  • स्वा. सावरकर ज्योत सावरकर गार्डन सावरकर रोड येथे प्रज्वलित
  • डोंबिवली अभिमान गीत डोंबिवलीकरांना समर्पित
  • डोंबिवलीकर संगीत महोत्सवाचे आयोजन
  • डोंबिवलीकरांना फ्री वायफाय सुविधा
  • रेशनिंग ऑफिस पूर्व नवीन वास्तू / पश्चिम शिफ्टिंग
  • पूर्ण कल्याण शीळ रस्ता काँक्रिटीकरण योजना
  • जोशी हायस्कुल उड्डाणपुल मान्यता
  • पार्लमेंट ते पंचायत या मोदीजींच्या उद्दिष्टाला कोकणच्या सर्व जिल्ह्यात तळागाळात पोहोचविण्याची जबाबदारी
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य मित्र पुरस्कार
  • विष्णू नगर पोलीस स्टेशन स्थलांतर व टिळक नगर पोलीस स्टेशन निर्माण
  • काटई ऐरोली रोड मान्यता
  • महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ
  • मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी व उपाययोजना बाबत अहवाल सादर करण्याची भाजपने दिली जबाबदारी
  • डोंबिवलीला जलमार्गाने येण्यासाठी जेट्टी बांधण्याची योजना
  • दुर्गाडी नवीन पूल मान्यता
  • डोंबिवलीतील शेकडो इमारतींना लागणारा तिप्पट प्रॉपर्टी टॅक्स पेनल्टीचा विषय पाठपुरावा सुरु
  • मेट्रो - कल्याण वरून डोंबिवली - मागणी मंजूर करून घेतली
  • सक्षम डोंबिवलीकर इव्हेन्टमधून शेकडो तरुणांना रोजगार प्रदान
  • 27 गाव अमृत योजनेतून 283 कोटींची पाणी योजना
  • डोंबिवलीत नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळवली.
  • साऊथ इंडियन शिक्षण संस्थेला फिजिओथेरपी कॉलेज मान्यता दिली
  • आमदार पदाची हॅट्ट्रिक. प्रचंड बहुमताने डोंबिवलीचा आमदार म्हणून निवडणूक जिंकली
  • स्टार्टअप बूट कॅम्पचे डोंबिवलीत आयोजन 120 नव उद्यमीच्या बिझनेस आयडिया सादर
  • आपलं घर वृद्धाश्रमाची स्थापना
  • डोंबिवलीचा स्वाभिमान आन मान ठाकूर स्मारकाचे भूमिपूजन
  • डोंबिवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरणासाठी प्रसिद्ध डोंबिवलीकर व्यक्तींच्या माहितीचे बोर्ड
  • कोरोना काळात पहिल्या लाटेत सहा महिने कम्युनिटी किचन द्वारे दररोज शेकडो लोकांना मोफत जेवण
  • लोकडाऊन काळात औषधे, फवारणी, कम्युनिटी किचन, व्यावसायिक कंपन्यांना परवाना याबाबत सतत कार्यरत
  • 470 कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरणाचा पाठपुरावा
  • घनकचरा उपविधी म्हणून नागरीकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काविरुद्ध आवाज उठवला
  • सार्वजनिक बांधकाम व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद म्हणून पदभार स्वीकारला.
  • इंजिनियर्स डे भाषणात पीडब्लूडीत बदल करायला आलो आहे म्हणून संदेश दिला.
  • सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद
  • महाराष्ट्रातील जनतेला 100 रुपयात आनंदाचा शिधा योजनेची दिवाळी गिफ्ट

प्रशस्तिपत्र

ताज्या घडामोडी

समाज माध्यमांवरील रविंद्र चव्हाण

बदल्यांसाठी येऊ नका

बदल्यांसाठी येऊ नका. मला लालसा नाही. बदल घडवायचा असेल तर जरूर या. पोस्टिंगची स्पर्धा सोडा. 15 सप्टेंबरच्या अभियंता दिनाला महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून विभागाच्या इंजिनीयर्सशी हार्ट टू हार्ट संवाद साधला.

व्यासपीठावर अनेक हुशार स्कॉलर लोक बसले होते. बहुतांशी सर्वच इंजिनियर्स, इंजिनियर्सचं गणित चांगलं असावं लागतं. कॉलेज जीवनात बारावीला PCB ऐवजी PCM मध्ये चांगले मार्क मिळवून त्याकाळी इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळवली. मी म्हणालो तुम्ही इंजिनियर लोकं PCB ऐवजी जीवनापासून B ला सोडता आणि M ला पकडता. M सोडा आता B ची वाट धरा. B फॉर बेस्ट असत.

जर इंजिनियर्सचं मॅथ्स चांगलं असतं तर मग रस्त्यांचं गणित का चुकतं?

नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारा. तुमचं नाव कोरलं जाईल असं काम करा….

भाषणात मी सर्व्हीसेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीतली अँड्रॉइड, उबर यासारखी उदाहरण मुद्दाम दिली. या दोन्ही सेवांनी जगात व्यत्यय क्रांती (Disruptive Technology) घडवली. तंत्रज्ञान आणि सुधारणा या माध्यमातून बांधकाम खात्यात सकारात्मक व्यत्ययकारी क्रांती घडविण्याचा माझा मानस आहे. कारण माझं ध्येयच राज्याच्या राष्ट्राच्या प्रगतीत आपला हातभार असावा हेच आहे. आपल्या देशाला असे हजारो हात हवेत…

17/09/2022

तिरंगा झेंडा आता फडकेल

आज भारतीय नौसेनेने आपल्या झेंड्यावरील इंग्रजांचे उरले सुरले अस्तित्व कायमचे पुसून टाकले. झेंड्यावरील क्रॉसचे चिन्ह पुसून त्या ठिकाणी तिरंगा झेंडा आता फडकेल. भारतीय नौसेना इथेच थांबली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेचे अष्टकोनी डिझाईन नेव्हीने बोधचिन्हासाठी झेंड्यात वापरले. छत्रपती शिवराय काळाच्या शेकडो वर्षे पुढे होते. आठ दिशांना कर्तृत्व गाजवणारे हिंदवी स्वराज्य महाराजांना स्थापन करायचे होते. त्याच प्रमाणे भारतीय नौदलाला आठ दिशांवर ठसा उमटवायचा आहे. म्हणून अष्टकोनी बोधचिन्ह.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेणं हे आपल्या रोमारोमात आहे. पण शिवाजी महाराजांच्या मूल्यांचं अनुकरण करणं आणि त्याला भारतीयत्वाची जोड देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतीलच असू शकत याबाबत दुमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराला देशाने आज अनोखी आदरांजलीच वाहिली आहे

हजारो वर्षांच्या हिंदू संस्कृतीच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न आजवर बाहेरील आक्रमकांनी केल्या. मोदीजींनी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या भाषणात स्पष्ट उल्लेखच केलेला जिथे जिथे गुलागिरीच्या खुणा आहेत तिथे तिथे पुन्हा भारतीय संस्कृती पुनर्स्थापित करणे हाच राष्ट्रीयत्वाचा भाजपाचा ध्यास आहे. त्यातीलच हे एक पाऊल….

शं नो वरुण: म्हणजेच जलदेवता वरूण आमच्यासाठी पावन आणि मंगलमय असू दे.

जय हिंद

2/9/2022

राजन गेला....

राजन सामंत दीर्घ आजाराने दुःखद निधन एवढी बातमी देऊन राजनचं जाणं संपणार नाहीये. निदान कल्याण डोंबिवलीकरांसाठी तरी. केडीएमसीचा सर्वात अभ्यासू नगरसेवक. प्रशासनाकडून कामे करून घेण्यात त्याचा हातखंडा. काळ्या पांढऱ्या केसांचा, मध्यम अंगकाठीचा, सतत कामं व माणसं खोळंबली आहेत या भावनेतून कार्यरत राहणारा आणि लोकांना कामाला लावणारा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आज आपल्यातून गेला आहे.

शेकडो लोकांच्या ओळखीचा होता तसाच हजारो लोकांना कोण राजन सामंत हे माहितीही नसेल. पण त्या हजारो लोकांच्या सार्वजनिक आयुष्यात या उचापती माणसामुळे केडीएमसीने मुकाट्याने सुविधांची कामे केलेली आहेत.

राजन महापालिकेचे नियम कोळून प्यायला होता. अधिकारी वर्ग राजनला टरकूनच असे आणि कॉन्ट्रॅक्टर वचकून असे. राजनला आपण गुंडाळू शकत नाही त्यापेक्षा इमानदारीत त्यांनी सांगितलेले काम केलेले बरे असं त्यांना वाटे. म्हणूनच राजनसारखी माणसं पक्षापेक्षाही समाजासाठी महत्वाची असतात.

तोंडाने फटकळ, प्रचंड जिद्दी स्वभाव, प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेण्याची घाई अशा लोकप्रतिनिधीला नको ते सर्व अवगुण म्हणावे असे राजनमध्ये होते. पण सारस्वस्तांना दैवी लाभलेली तल्लख बुद्धी, कामाच्या ठिकाणी झोकून द्यायची वृत्ती, कर्तव्यबुद्धीची सतत जाणीव आणि जबाबदारीने दिलेले काम पार पडण्याची क्षमता, प्रशासनात दरारा हे त्याचे गुण हेवा वाटावा असेच होते.

राजनचा सामंत साहेब कधी झाला नाही. नगरसेवक असताना नाही की नसताना नाही. हिंदुत्वाच्या प्रसाराचं काम असो, केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो, मतदार याद्यांच्या अभ्यासाचा विषय असो की पाणी वीज कचरा पायवाटा किंवा केडीएमसीच्या क्लिष्ट कामाचा विषय राजनला पर्याय नव्हता.

राजनने खरोखर एक पोकळी निर्माण केली आहे. स्वार्थापेक्षा सार्वजनिक हिताचे काम प्रायोरिटीने करणारा माणूस भाजपनं आणि डोंबिवली शहरानं गमावलाय….

आता कोणाला फोन करू मी, राजन….. !!

2/9/2022

तिरंगा...मॅडम कामा आणि सावरकर....

तिरंगा…मॅडम कामा आणि सावरकर….

मंत्रालय, मॅडम कामा रोड, मुंबई 32. हा पत्ता पॉवरफुल महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राचा. मंत्रालयाची वास्तू उभी असलेल्या मॅडम कामा रोडला ज्या भिकाजी कामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या रस्त्याला नाव दिले आहे, त्या भारतीय तिरंगा झेंड्याच्या मुख्य प्रेरणास्थान आहेत.

धनाढ्य पारशी कुटुंबात जन्मलेल्या पण स्वराज्य स्थापनेसाठी अनेक वर्षे लढा देणाऱ्या मॅडम या थोर स्वातंत्र्य सेनानी होत्या. पारतंत्र्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडलेल्या मॅडम कामा यांनी जगातील २० टक्के मानवजात ब्रिटिशांच्या गुलामगिरीत पिचत आहे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. आणि क्रांतीची ठिणगी पेटवली. पूर्ण पाश्चिमात्य जगात त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजवली होती.

आपल्या आजच्या तिरंगा झेंड्याची मूळ संकल्पना असलेला झेंडा २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीच्या स्टुटगार्ट इथे जागतिक समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना मॅडम कामा यांनी पहिल्यांदा फडकावला होता. त्या झेंड्यावर ८ तारे, सूर्य आणि वंदे मातरम हे देवनागरी भाषेत लिहिलेले शब्द होते. विशेष म्हणजे तो झेंडा मॅडम कामा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मिळून डिझाईन केला होता. तत्कालीन काँग्रेसने २२ वर्षांनी १९२९ च्या लाहोरच्या अधिवेशनात भारताचा राष्ट्रीय झेंडा म्हणून तिरंगा झेंड्याला मान्यता दिली. तेव्हा मॅडम कामा आणि स्वा. सावरकरांच्या मूळ तिरंगी झेंड्याचे विकसित रूप म्हणूनच सध्याचा तिरंगा झेंडा बनवला. याबाबत विस्तृत लेख वैभव पुरंदरे यांनी टाइम्स ऑफ इंडिया मुंबई आवृत्तीत १४ ऑगस्ट रोजी लिहिला आहे. अतिशय उदबोधक व वाचनीय लेख जरूर वाचा….

मॅडम कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर, शामजी कृष्ण वर्मा आणि हजारो ज्ञात व अज्ञात योध्यांच्या बलिदानावर आज देश उभा आहे. केवळ यांच्या संघर्षामुळे, त्यागामुळे आणि रक्तरंजित क्रांतीमुळे ठाणे येथे शासकीय झेंडा वंदन सोहळ्यात आज तिरंगा फडकवण्याचे भाग्य मला मिळाले….. वन्दे मातरम….

जय हिंद !!!

15/08/2022

महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी ऐतिहासिक दिवस

महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी ऐतिहासिक दिवस
महायुतीच्या आश्वासनाची ध्येयपूर्ती झाली.

भाजपाने शब्द दिला तो खरा केला. महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या ओबीसी समाजाला आज हक्काचे आरक्षण पुनर्स्थापित झाले. महायुतीच्या सरकारने दिलेल्या आश्वासनाची आज खऱ्या अर्थाने ध्येयपूर्ती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऊर्जेने, तत्परतेने आणि देवेंद्रजींच्या प्रश्नाच्या खोलवर जाऊन काम तडीस नेण्याच्या कार्यकुशल पद्धतीने आजचा ऐतिहासिक दिवस ओबीसी समाजाला दिसला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

महाविकास आघाडीने अडीच वर्षांपासून राज्याच्या विकासाला महाब्रेक तर लावला होताच पण त्यांचा धोरण लकवा करोनाच्या महामारीहूनही गंभीर होता. राज्य कारभार हाकण्याची उदासीनता, सुसंवादाचा पूर्ण अभाव, चांडाळ चौकडीचे मंत्रालयावरील वर्चस्व, निर्णय ताटकळत ठेवण्याची सरंजामी वृत्ती आणि ओबीसी आरक्षणाबाबत

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत कळकळीने, मुत्सद्दीपणे आणि कायदेशीर चौकटीचा उत्तम अभ्यास करून ओबीसी समाजाच्या राज्यातील कोट्यवधी लोकांना हक्क प्राप्त करून देण्याचे ध्येय आज गाठले.

महाराष्ट्रातील कुणबी, माळी, तेली, तांबोळी आणि अठरा पगड जातींना ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाने प्रचंड अपमानित व्हावे लागले होते. त्यांना हक्काच्या
“महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळून दिल्याशिवाय भाजपा संघर्ष करत राहील, आम्ही स्वस्थ बसणार नाही” हे भाजपाने वचन दिलेले याची आज आठवण झाली.

सबका साथ सबका विकास !
जय हिंद जय महाराष्ट्र !!

20/07/2022

ती 4 जुलै आणि ही 4 जुलै.....

4 जुलै 1776 ही तारीख एका राष्ट्राच्या स्वातंत्र्याची पहाट घेऊन उगवली. पुढे ते राष्ट्र जागतिक महासत्ता म्हणून आणि ती तारीख नैसर्गिक हक्क, समता, बंधुत्व यासाठी जगाच्या इतिहासात संस्मरणीय ठरली. विषमता, गुलामगिरी आणि सत्तेचा उन्माद उलथवून टाकणाऱ्या नेतृत्वाने जनतेला हक्क आणि लोकराज्य बहाल केले.
4 जुलै 2022 ही तारीख महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासदर्शक लोकभावनेचा आदर करणारी सकाळ म्हणून इतिहासात नोंद होईल अशीच ठरली. भारतीयत्व, वैचारिक बांधिलकी, नैसर्गिक युती आणि लोकभावना यांचा आदर करणाऱ्या नेतृत्वाने वैचारिक व्यभिचार, अनैसर्गिक आघाडी आणि कपटी नेतृत्वाला जनतेच्याच दरबारात झिडकारले.

तो दिवस आणि हा दिवस. एका अनोख्या समान स्वातंत्र्याची कहाणी सांगणारा ठरला.

आता महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीच्या महावेगाने घोडदौड करेल !

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

4/07/2022

डोंबिवलीकर ठाकूर बंधूंच्या हौतात्म्याला २८३ वर्षे झाली

डोंबिवलीबाबत असं नेहमी म्हटलं जातं की तुमच्या डोंबिवलीला शंभर वर्षांचा मध्यमवर्गीय चाकरमान्यांचा इतिहास आहे….हो आहे…आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे…
पण ऐका…पहा….आणि वाचा…आम्हा डोंबिवलीकरांचा शौर्याचा…त्यागाचा….हौतात्म्याचा काय आणि कसा गौरवशाली इतिहास आहे….

सन १७३९. पोर्तुगीजांचे वसईकर जनतेवर अत्याचार होत असल्याचे पेशवे सरकारला कळले ते आगरी पंच मंडळींकडून. वाडा तालुक्यातील कंचाड गावच्या इनामदारांमार्फत पेशवे दरबारात निवेदन दाखल झाले. धर्मावर आलेले गंडांतर निवारण करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पानी विडा उचलला.
वसईची मोहीम केवळ जमिनीवरची नव्हती तर पाण्यावरही लढायला लागणार असल्याचं चिमाजी आप्पास कोकणचा सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी कळवले. वसई किल्ला पाण्यातला आहे. त्यासाठी तराफे, होड्या, गलबते कल्याण, अंजूर, ठाणे या भागातून उपलब्ध होणार होते. दारुगोळा, रसदही जमिनीमार्गे आणि गलबते कळवा खाडीमार्गे भाईंदर बंदर येथे पोहोचवण्याचे ठरले. १७ फेब्रुवारी १७३९ मराठा सैन्याने वसई किल्ल्याला वेढा दिला.

वसई किल्ल्याला ११ बुरुज…अनेक बुरुज अथांग समुद्राला आव्हान देणारे. पोर्तुगीजांकडे अत्याधुनिक युद्धसामुग्री, त्यात निसर्गाचीही साथ. मे महिना उजाडला, वेढा देऊन तीन महिने झाले. किल्ल्याचे बुरुज काही ढासळत नव्हते. पोर्तुगीज सैन्य हटत नव्हते.
मराठ्यांच्या छावणीत चिंता दाटून आली. अशातच पेशव्यांच्या छावणीत आगरी जातीची पंचमंडळी आली. सोबत दोन तरुण…

पंच म्हणाले महाराज हे दोन युवक सख्खे भाऊ असून उत्तम दर्यावर्दी आहेत. त्यांना सुरुंग लावण्याची कला अवगत आहे. कल्याण परिसरातील डोंबिवली गावचे रहिवासी आहेत. आन ठाकूर….मान ठाकूर…अशी त्यांची नावे आहेत…ह्यांना सुरुंगाचा दारुगोळा द्या….

३ मे १७३९. दोघेही रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी पहारी घेऊन पोहत किल्ल्याच्या तटाला गेले. एकेक चिरा निखळून त्यात सुरुंग भरला…सकाळच्या प्रहरी स्फोट घडवले त्यात दोन बुरुज निकामी झाले. किल्ल्याला मोठे खिंडार पडले. सुरुंग स्फोटात आन ठाकूर आणि मान ठाकूर यांनी मराठा साम्राज्यासाठी व धर्मरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. मराठा सैन्याने किल्ल्यात धडक मारली. अवघ्या १३ दिवसात १६ मे १७३९ रोजी चिमाजी आप्पानी वसईवर भगवा फडकावला.

डोंबिवली कल्याण भिवंडी गावच्या भूमिपुत्र आगरी समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरांमध्ये, वीर कथांमध्ये, शाहिरी पोवाडे यातून आन आणि मान ठाकूर यांच्या शौर्यासंबंधी उल्लेख आलेला आहे. हभप शंकरबुवा पाटील यांनी लिहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्याचा लढा व क्रांतिवीर आंदोलनं या पुस्तकातील हे संदर्भ.

या घटनेला २८१ वर्षे झाली…आजही ठाकूर बंधूंची शौर्यगाथा ऐकली…वाचली की अंगावर रोमांच उभं राहतं.
आपल्या डोंबिवलीच्याच शाहीर विवेक ताम्हणकर यांनी पोवाडा रचला आणि गायला होता ज्या दिवशी २५ ऑगस्ट २०१९ला डोंबिवली पश्चिमेला गणेशनगर – राजूनगरमध्ये आन ठाकूर मान ठाकूर यांना समर्पित स्मृतिस्थळ भूमिपूजनाने आगरी समाजातील मान्यवरांच्या हस्ते कामाला प्रारंभ केला होता.

आता तर ते स्मृतिस्थळ तयार झालंय…
३ मे रोजी प्रस्तावित उदघाटन होणार होतं. मात्र सद्य परिस्थितीत ते अशक्य झालंय. लवकरच ते होईल असा विश्वास आहे.
नंतर मात्र आपल्या मातीतल्या शूरवीरांना मानवंदना देणारं अनोखं स्मृतिस्थळ आपण जरूर पाहायला जावं..नतमस्तक व्हावं….

30/04/2022

रामभाऊ आपलं स्वप्न साकार झालंय....

रामभाऊ आपलं स्वप्न साकार झालंय….

आज रामभाऊ म्हाळगी हवे होते. ठाण्यापुढील लोकल रेल्वे प्रवाश्यांचा आवाज संसदेत पहिल्यांदा समर्थपणे मांडणारे आणि मुंबई ते ठाणे-डोंबिवली-कल्याण-कर्जत-कसारा प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वे प्रवाश्यांची बाजू रेल्वे समितीसमोर मांडणाऱ्या रामभाऊ म्हाळगी – रामभाऊ कापसे यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या ट्रॅकचे लोकार्पण मुंबईकरांच्या सेवेसाठी करणार आहेत. त्यामुळे प्रवास सुखकर आणि गतिमान तर होईलच पण त्याच बरोबर ठाण्यापुढे कर्जत कसारा लाईनवर लोकल सेवेची फ्रिक्वेन्सी अजून वाढेल.

मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई सबर्बन सेवेसाठी आणि स्टेशनच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात ना भूतो न भविष्यति अशी अब्जावधी रुपयांची तरतूद केली त्यानंतरच मुंबई लोकल आणि स्टेशन सुविधांना खऱ्या अर्थाने गती प्राप्त झालेली आहे. 2009 ते 2014 दरम्यान केवळ 1100 कोटी बजेट मिळणाऱ्या महाराष्ट्राला यावर्षी अर्थसंकल्पात 11000 कोटी मिळाले. मोदीजींच्या गतिमान निर्णय क्षमतेमुळेच हे शक्य झालंय.

गेल्या 7 वर्षात मुंबई सबर्बन सेवेसाठी पायाभूत सुविधांची रेलचेल सुरु झाली. नवे हवेशीर लोकल डब्बे, वातानुकूलित लोकल, सर्व स्थानकात प्रशस्त ब्रिज, लिफ्ट व सरकते जिने, धोकादायक रेल्वे क्रॉसिंग बंद करून तिथे रोड ओव्हर ब्रिजची उभारणी ही काही लक्षणीय कामे मोदीजींच्या अर्थसंकल्पाने झाली आहेत.

आज मोदीजींच्या उपस्थितीत पाचव्या सहाव्या ट्रॅकचं उदघाटन हीच रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसेंच्या कार्याला खरी श्रद्धांजली असेल !

17/02/2022

राजू बनला सैनिक

दहा बारा वर्षांपासून जर तुम्ही आमच्या सावरकर रोड कार्यालयात येत असाल तर या फोटोतला चेहरा पुन्हा एकदा पहा. तरतरीत चेहऱ्याचा कधीही कामाला तत्पर असा चपळ राजू तुम्हाला आठवेल. मी लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करायला लागल्यावर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत जोडले गेले. त्यातलाच एक राजू. काळाच्या ओघात पुढे अनेक जण करियरच्या वेगवेगळ्या निवडून यशस्वी झाले. त्यातील एक नाव राजू म्हणजेच प्रमोद पांडुरंग करंबेळे.

राजू सैनिक म्हणून देशसेवेत रुजू झाला आहे. मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या बटालियनद्वारे आसाम राज्यात तो पोस्टिंगवर आहे.

राजू बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा डोंबिवलीत आला होता. दादा भेटायला यायचं होतं असा निरोप मिळाला. आज कुटुंबासमवेत त्याची भेट झाली. सैनिक म्हणून देशसेवा त्याच्याहातून घडत आहे म्हणून तो खूप नशीबवान आहे हे मी समजतो.

आपला कार्यकर्ता वर्दीत भेटायला येणं आणि आपल्याला त्याच्या बरोबर छायाचित्र काढता येणं हे भाग्य आज मला प्राप्त झाले.

जय हिंद !

माझी डोंबिवली

गाजलेली भाषणे

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे अभियंता दिनाचे भाषण फार गाजले. बांधकाम मंत्र्याने नव्हे तर जनसामान्यांचा प्रतिनिधी आणि जनसेवक या नात्याने केलेला तो हृदयस्थ संवाद होता. भाषणातील ठळक मुद्दे...

सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज अनेक आव्हाने असली तरी यासर्वांवर मात करून प्रत्येक कामामध्ये सकारात्मकता आणून नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याबरोबरच प्रत्येकाने सर्वोत्कृष्ट काम करण्याचा संकल्प करून राज्याला प्रगतीपथावर नेवूया, तसेच आपल्या विभागाची कामगिरी सर्वोत्तम करण्याच्यादृष्टीने विभागाचा कारभार स्वच्छ व पूर्णपणे पारदर्शक ठेवायाला हवा. विशेष म्हणजे विभागात कोणामध्येही कसल्याही प्रकारची असलेली सध्याची अंतर्गत स्पर्धा संपली पाहिजे. आपला विभाग हा जनसामान्यांशी जोडलेला असल्यामुळे यापुढे विभागाची प्रतिमा व कामाची गुणवत्ता,दर्जा अधिक सुधारूया.

Read More

अंतर्गत स्पर्धा संपवून विभागाचा कारभार स्वच्छ व पूर्णपणे पारदर्शक ठेवा विभागाची प्रतिमा व कामाची गुणवत्ता अधिक सुधारा

राज्यातील ग्रामीण भागांमध्ये सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमधील प्रत्येक गाव एकमेकांना जोडण्याच्यादृष्टीने गावांगावांध्ये साकव (लहान पूल) उभारण्याची योजना निर्माण करणे गरजेचे आहे.

त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने अधिक मदत होईल. सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुमारे ५०० ते ६०० पूल उभारणीसाठी सुमारे ५० लाख ते ५ कोटीपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने एक व्यापक योजना तयार करुन आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी व्यासपिठावर उपस्थित केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी यांसदर्भात प्रस्ताव तयार करण्याची सूचनाही याप्रसंगी केली.

Read More

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सुमारे ६०० लहान पूल उभारण्याची आवश्यकता -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण