या अभियानांतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे मुबलक प्रमाणात स्वच्छ, सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.
✅पात्रता निकष
- अर्जदार भारताचा मूळ नागरिक असणे अनिवार्य आहे.
- ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- ज्या घरात आधीपासून नळाद्वारे पाणीपुरवठा नाही, अशा घरांना प्राधान्य दिले जाते.
- या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील लोकांनाच देण्यात येईल.
📄आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- वय प्रमाण पत्र
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साइज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाइल नंबर
- ईमेल आयडी
🌐 अधिकृत संकेतस्थळ
https://jaljeevanmission.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. तसेच आपल्या ग्रामपंचायतीत आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये देखील या योजनेचा अर्ज भरता येईल.