आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

ग्रामीण तसेच शहरी भागातील दुर्बल घटकांसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबांना पक्के घर उभारण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवले जाते. 

✅ पात्रता निकष 

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) किंवा नवबौद्ध आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच लाभ
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे: लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखाली असावा
  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर ४०% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असेल तर) तसे लाभ घेता येईल

📄 आवश्यक कागदपत्रे

  1. ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारा
  2. घरपट्टी, पाणीपट्टी, किंवा विद्युत बिलाची पावती
  3. जात प्रमाणपत्र 
  4. उत्पन्नाचा दाखला 
  5. मतदार ओळखपत्र
  6. शिधापत्रिका 
  7. सरपंच/तलाठी प्रमाणपत्र
  8. महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर पावती

📝 अर्ज कुठे करावा ?
समाज कल्याण कार्यालय साहाय्यक आयुक्त, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद/महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा.