या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण पुरवण्यात येते, तसेच नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते.
✅ पात्रता निकष
शेतकरी हा विमा उतरवलेल्या जमिनीवर शेती करणारा किंवा शेतीकामातभाग घेणारा असावा.
शेतकऱ्यांकडे वैध आणि प्रमाणित जमीन मालकी प्रमाणपत्र किंवा वैध जमीन भाडेकरार असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याने विहित मुदतीत म्हणजे पेरणीचा हंगाम सुरू झाल्यापासून २ आठवड्यांच्या आत विमा संरक्षणासाठी अर्ज करावा.
त्यांना त्याच पिकाची नुकसानभरपाई इतर कोणत्याही स्रोताकडून मिळाली नसावी.
नावनोंदणीच्या वेळी शेतकऱ्याचे वैध बँक खात्याचे तपशील आणि ओळखपत्र सादर करावे.
हंगामात अधिसूचित क्षेत्रामध्ये अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी ज्यांना पिकामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य आहे ते पात्र आहेत.
अर्जदाराचा वास्तव्याचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड)
शेत मालकीचे असल्यास सात-बारा उतारा / खाते नंबर आदी कागदपत्र, शेतात पिकांची पेरणी झालेली असल्याचा पुरावा, शेतकरी असल्याचे तलाठी, सरपंच तथा ग्रामसेवकांचे पत्रइ.
जर शेत कसायला घेतले असल्यास व पीक पेरणी झाली असल्यास जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी/झेरॉक्स
अर्जदाराच्या बँक अकाउंटचा क्रॉस चेक
✔ प्रीमियम दर
खरीप हंगामातील पिके – २% प्रीमियम
रब्बी हंगामातील पिके – १५% प्रीमियम
व्यापारी आणि बागायती पिके-५% प्रीमियम
जवळच्या बँकेत जाऊन किंवा http://pmfby.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या योजनेचा अर्ज दाखल करता येतो.
Leave Your Comment