श्री विठु माऊली चॅरिटेबल ट्रस्ट बाल संजीवन छावणीचे उद्घाटन माननीय सौ.अमृता फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या छावणीत गरोदर माता, शिशु, यांचे पोषण आहार व औषधोपचार होणार आहेत. जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
पालघर जिल्हातील जव्हार तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकासभवन जव्हार येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील अडचणी व समस्या समजावून घेतल्या. तसेच शासकीय भात खरेदी केंद्राबाबत जनजागृती करण्यात यावी, शासनाच्या विविध योजनांचा तालुक्यातील जनतेला लाभ मिळावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.